
बीड मतदारसंघात माळेगाव, रुई गव्हाण, वाढवाणा, पिंपळगाव घाट, मानेवाडी येथून श्रीक्षेत्र नारायणगड ते पंढरपूर जाणाऱ्या दिंडी मार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली.या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अतिशय जिव्हाळ्याच्या या रस्ताकामा बाबत विशेष लक्ष घातले . आमदार क्षीरसागर यांनी ग्रामस्थांसोबत कामाची पाहणी केली, रस्ता काम लवकरच पुर्ण होणार आहे. आमदार क्षीरसागर यांनी सांगितले की ते काम अत्यंत तातडीने होणे गरजेचे असून लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करीत आहोत



