रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे ठरेल वरदान; तज्ञांच्या मते याचे सेवन केल्यास ‘हे’ आजार कधीही होणार नाहीत
लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो कारण त्याच्या मदतीने आपण अनेक गंभीर आजारांपासून आपण दूर राहू शकतो. न्यूट्रिशन तज्ञाकडून जाणून घ्या त्याचे फायदे…. लसूण हा प्रकार भारतातील प्रत्येक घरात आढळतो. जेवणात लसणाचा वापर प्रामुख्याने केला जातो. अशी कोणतीही रेसिपी नाही आहे ज्यात लसणाचा वापर केला जात नाही. लसणाने जेवणाला उत्तम चव येते. लसणाचा प्रभाव गरम असतो आणि त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका टळतो. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ञ निखिल वत्स यांच्या मते, लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाणे आवश्यक आहे कारण त्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया याचे फायदे…
रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
कॅन्सरपासून बचाव
लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे सकाळी काहीही न खाता लसूण चघळल्यास कॅन्सरचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. मधुमेहासाठी फायदेशीर
लसणात अॅलिसिन नावाचे संयुग असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या ४ पाकळ्या खाव्यात. याने साखर नियंत्रित राहण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते.
वजन कमी होईल
जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल. त्यात असे काही संयुगे आढळतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. नैराश्य दूर होईल
लसणाचे सेवन मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे, याच्या मदतीने आपले मन संतुलित राहते आणि नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते. तणाव टाळण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.