Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Maharashtra Weather Today (आजचे हवामान, 12 सप्टेंबर): महाराष्ट्रासाठी 24 तासांचा रेड-ऑरेंज अलर्ट! तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा महाराष्ट्रात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. हवामानातील बदलामुळे पावसासाठी पोषक प्रणाली सक्रिय होत असून, पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

12 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम, तर काही भागांत जोरदार पाऊस पडू शकतो. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट नसून, काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विशेष म्हणजे धुळे आणि नंदुरबारसाठी पुढील दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे, सोलापूरमध्ये यलो अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा आणि सोलापूर या भागांना यलो अलर्ट आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे कोणताही अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे.

मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस महत्त्वाचे

एकूणच, 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात यलो अलर्ट असून, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत जोरदार सरींची शक्यता आहे. पुढील दोन दिवस हवामानात हा बदल कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या सरींमुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस किती दिवस टिकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *