Navgan News

ताज्या बातम्या

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील चहाचा आस्वाद घेतला


औरंगाबाद : औरंगाबाद की चाय बढीया…असे म्हणत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील चहाचा आस्वाद घेतला.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीटलाइनचे भूमीपूजन होत आहे. याप्रसंगी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड , पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सतीश चव्हाण आदी उपस्थित आहेत.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची पाहणी केली. रेल्वेस्टेशनच्या पुर्नविकास आराखड्याचा आढावा घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *