Navgan News

ताज्या बातम्या

पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात ..


पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले होते.

 

पण असे असले तरी प्रत्यक्षात भारताने फक्त दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. स्वतः निवडलेले टार्गेट पूर्ण केले. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्यदल यांना टार्गेट केले नाही, असे भारतीय सैन्य दलाने स्पष्ट केले. यातूनच भारताने पाकिस्तानला आणि सगळ्या जगाला स्पष्ट संदेश दिला.

 

व्हिडिओ येथे पहा !

 

भारताने दहशतवाद्यांना “शिक्षा” केली आहे. ती मुळातच पाकिस्तानने करणे अपेक्षित होते. परंतु पाकिस्तानने तशी शिक्षा न केल्याने भारताला त्या दहशतवाद्यांना “शिक्षा” करावी लागली. इथून पुढे या दहशतवाद्यांच्या “मालकांना” “शिक्षा” करू हा तो संदेश आहे.

 

 

त्या पलीकडे जाऊन भारताने पश्चिम सीमेवर हवाई दल सज्ज ठेवले असून पाकिस्तान कुठलीही आगळीक करणार असेल तर त्याला जागीच ठेचायचे प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः काल रात्रीपासून लक्ष ठेवून होते. ते ऑपरेशन मध्यरात्री पूर्ण झाले. त्यानंतर पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात लगेच आणीबाणी जाहीर झाली. लाहोर, सियालकोटचे विमानतळ बंद झाले. भारताने देखील उत्तर भारतातली नागरी हवाई सेवा तात्पुरती बंद केली. त्याचवेळी भारतीय हवाई दलाची सर्व विमाने आणि विमानतळ ठेवली. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर ही पाकिस्तान वरच्या कारवाईची सुरुवात असून पुढे बरीच लष्करी कारवाई बाकी आहे, असेच यातून भारतीय सैन्य दलाने सूचित केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी अकरा वाजता डिलीट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्सची बैठक बोलावली असून त्यात पुढची रणनीती ठरविली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *