Navgan News

आंतरराष्ट्रीयधार्मिकनवगण विश्लेषणराष्ट्रीय

जगन्नाथ मंदिराचा खजाना ४८ वर्षानंतर उघडला,रहस्यमय आवाज आणि सोने-चांदीने भरलेले गुप्त चेंबर्स…

Jagannath Temple:ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील खजाना ४८ वर्षांनंतर उघडण्यात आला आहे. या देवाच्या या रत्न भांडारात बहुमुल्या दागिन्यांची गिनती करण्याचे काम केले जात आहे. असे म्हटले जाते की या खजान्यात सोने आणि चांदी, हिरे-मोती यांचा अक्षरश: खच आहे.

मंदिराच्या प्रांगणात आज देखील असे अनेक गुप्त चेंबर आहेत, ज्यात खजाना असल्याचा दावा केला जातो. तसेच मंदिरात एक गुप्त भुयार असल्याचा दावा पुजाऱ्यांच्या वंशजांनी केलेला आहे. चला तर पाहूयात या भुयाराचे राज काय आहे ? येथे कोणत्या खजाना असल्याचा दावा केला जात आहे आणि तो शेकडो वर्षे कसा सुरक्षित आहे.

मंदिराचे पुजारी सांगतात की जगन्नात मंदिरातील खजान्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने-चांदी आणि बहुमुल्य रत्ने होती की दर शंभर वर्षांनी एकदा होणाऱ्या रघुनाथ शृंगारात संपूर्ण चित्ररथ सोने आणि रत्नांनी भरुन जायचा. त्यामुळे या सोने आणि रत्नांच्या आकर्षणामुळे परदेशी आक्रमकांचे लक्ष वारंवार पुरीकडे वेधले जायचे.

देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असल्याचा दावा

इतिहासात उल्लेख आहे की ज्या प्रकारे सोमनाथ मंदिराला परदेशी आक्रमकांनी १७ वेळा लुटले होते. त्याच प्रकारे जगन्नाथ मंदिर लुटण्याचा देखील १८ वेळा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी मंदिराच्या रक्षकांनी ठाकूरजींच्या मूर्तीचे त्या आक्रमकांपासून रक्षण केले होते.जेव्हा जेव्हा आक्रमण व्हायचे होते तेव्हा रक्षक मूर्तीला त्यांचे पूर्वज मंदिरातील गुप्त भुयारात घेऊन जायचे. असे म्हणतात त्या भुयारात आजही मोठा खजाना लपवलेला आहे.

जगन्नाथ मंदिराचे पुजारी पंडित सोमनाथ यांनी सांगितले की या मंदिरावर १८ वेळा आक्रमण झाले आणि हे भारताचे सर्वात मोठे आणि श्रीमंत मंदिर आहे.

जगन्नाथ मंदिराच्या देवाच्या या मूर्तींना दर १२ वर्षांनी एकदा बदलण्याची परंपरा आहे. जेव्हा मूर्ती बदलली जायची तेव्हा मंदिराला बंद केले जायचे. शहरातील वीज बंद केली जायची. पुजाऱ्याच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधून हे काम केले जायचे. त्यावेळी रत्न भंडारातून अनेक रहस्यमय आवाज ऐकू यायचे असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.

रत्न भंडारातून रहस्यमय आवाज

पुजारी बासुदेव म्हणतात की आम्ही या संदर्भात अनेक कहाण्या ऐकायला मिळायचे. या मंदिरात सांपाचे फुत्कार देखील ऐकू यायचे. तेथे एक अन्न भरलेला हंडा देखील ठेवला जायचा.या हंड्यातील अन्न कोण खायचं हे आजपर्यंत कळालेले नाही.आम्ही लोक रत्न भंडारसमोर १५ दिवस काम करायचो.जेव्हा जगन्नाथ जी यांची वीज कापली जायची. दाट काळोख असायचा. जेव्हा खूप सारे आवाज ऐकायला यायचे.

भगवान जगन्नाथ यांचे सध्याचे मंदिर सातव्या शतकाचे म्हटले जाते. शतकांपासून या दिव्य मंदिराचे स्वत:चे कठोर व्यवस्थापन आहे. परंपरा आहेत आणि त्याहून अधिक रहस्य आहेत. जे उर्वरित जगासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिले आहेत. परंतू जगभरातील भक्त संपूर्ण आस्थेसोबत मंदिराशी संबंधित परंपरा आणि रहस्यांचा सन्मान करत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *