ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

राजकारणासाठी ‘हे’ करणं चुकीचं; भाजप आणि PM मोदींनी नेहमीच छत्रपतींचा सन्मान केलाय!


भाजप आणि मोदींकडून छत्रपतींचा मानसन्मान ठेवण्याचे सातत्याने काम केले जात आहे. राज्यातही छत्रपतींसोबत सर्व महापुरुषांचा सन्मान ठेवला जात आहे.

शिर्डी : मंत्रिपदाचा निर्णय पक्ष आणि देवेंद्र फडणवीस  घेतील.

देवेंद्रजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील याची खात्री आहे, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी व्यक्त केला.

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी ते आले होते. त्या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. दरम्यान, भाजप आणि मोदींकडून छत्रपतींचा मानसन्मान ठेवण्याचे सातत्याने काम केले जात आहे. राज्यातही छत्रपतींसोबत सर्व महापुरुषांचा सन्मान ठेवला जात आहे.

दुर्दैवाने महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदातीकरण केले जात आहे, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ”मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनाला येत असतो. सर्वांवर आशीर्वाद राहू द्या अशी साईंच्या चरणी प्रार्थना केली. कुटुंबीयांसाठीही प्रार्थना केली. समृद्धीच्या अपघातावरून राजकारण करणे योग्य नाही, असेही शिवेंद्रराजे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, फक्त रस्त्याला दोष देऊन चालणार नाही, तर अपघातांची चौकशी देखील झाली पाहिजे, तसेच शासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्या कुटुंबावर संकट कोसळले त्यांच्या दुःखाचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्या कुटुंबांना दुःखातून बाहेर पडण्याची ताकद मिळो.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *