क्राईम

पती बाहेरगावी, 3 मुलांच्या आईचं फेसबुकवर तरुणासोबत अफेअर, मग नेमकं पुढे काय घडलं?


असं म्हणतात की, प्रेमात व्यक्ती आंधळा होतो आणि हव्या त्या गोष्टी करतो. गेल्या काही दिवसांत अनैतिक संबंधांच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेने सर्वांना हादरा बसला आहे.

बिहारच्या कटिहार जिल्ह्यातून ही घटना समोर आली. कटिहार जिल्ह्याच्या कोढा परिसरातील तीन मुलांच्या आईला फेसबुकवर एका तरुणाशी प्रेम झाले. यानंतर तिने आपल्या तिन्ही मुलांना सोडत प्रियकरासोबत लग्न केले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तीन महिन्यांपासून होत होता संवाद –

व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे की, कटिहार जिल्ह्यातील कोढा परिसरातील खेडिया गावातील बेलाल चोकाजवळ फेसबुकवरुन प्रेम झालेल्या या लव्हस्टोरीचे साक्षीदार झाले. 30 वर्षांच्या महिलेने आपल्या तीन मुलांना सोडून एका तरुणासोबत रस्त्यावर उतरुन लग्न केले. महिलाने सांगितले की, 3 महिन्यांपासून फेसबुकवर तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते. व्हिडिओ कॉलिंगद्वारेही ती आपल्या प्रियकराशी संवाद साधायची.

यानंतर दोघांचे प्रेम फुलले. दोन्हीही एकमेकांना भेटण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी आतुर झाले होते. यानंतर त्यांनी खेडिया बेलाल चौक याठिकाणी आले. याठिकाणई गावकऱ्यांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यानंतर त्यांचे लग्न लावून दिले.

पंचायतीद्वारे दोन्ही प्रेमीयुगुलांचे लग्न –

या घटनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिली. यानंतर महिला व तरुणाची पंचायमध्ये चौकशी करण्यात आली. यानंतर तरुणाने फेसबुकवर महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू झाल्याचे सांगितले. त्यानंतर प्रियकर आणि प्रेयसी दोन्ही भेटायला आले. प्रेयसीने आपल्या तीन मुलांना सोडून तरुणाशी लग्न करण्यासाठी घर सोडले आणि भेटायला आली.

महिलेचा पती बाहेर राहतो. मात्र, इकडे पंचायतीच्या माध्यमातून प्रियकर आणि ही 30 वर्षांची महिला या दोघांचे लग्न लावण्यात आले. याठिकाणी दीड तास हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *