Navgan News

धार्मिक

वारकरी ‘राम कृष्ण हरी’ जप का करतात? जाणून घ्या आध्यात्मिक महत्व …


आषाढी एकादशीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. यंदा आषाढी वारी १९ जूनपासून सुरु होणार आहे. या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.

आषढी वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. उन्हाच्या झळा असो किंवा पावसाच्या धारा वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेत असतात. प्रत्येक वारकरी ‘राम कृष्ण हरी’ जप करत असतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की हाच मंत्र का जपतात? याचा अर्थ काय आहे? चला तर मग आज या मंत्राचा अर्थ आणि महत्व जाणून घेऊया.

 

यंदा आषाढी एकादशीची वारी १९ जूनपासून सुरू होणार आहे. ही वारी आळंदी आणि देहु वरुन निघणार आहे.तर संत तुकाराम माहाराजांची पालखी देहुवरून १८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. संत ज्ञानेश्वर महारांची पालखी १९ जून रोजी प्रस्थान करणार आहे. तसेच ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असणार आहे. .

 

पहिला अर्थ

‘राम कृष्ण हरी’ या मंत्रात राम, कृष्ण आणि हरी या तीन देवतांना समावेश आहे. राम म्हणजे प्रबू राम- सगळ्यांना आनंद देणारा, कृष्ण- सर्वांना आकर्षति करणारा,हरी-सर्वांचे दुख हरणारा. यामुळे वारकरी या मत्राचा जप सारखा करतात.

दुसरा अर्थ

हरि तुझे नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणे काही ।।

अंतरी विश्वास अखंडे नामाचा । काया मने वाचा देईं हेंचि ।।

तुका म्हणे आता देईं संतसंग । तुझे नामी रंग भरो मना ।।

तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा, हे श्री हरी मी अखंड तुझे नाव घेत राहील, तुझी सेवा करिन, तुझी पूजा करिन याव्यतिरिक्त मी कर्मकांडाला महत्व न देणारा आणि इतरांच्या मते पाखंडी असणारा काहीही जाणत नाही. ते म्हणतात माझा फक्त आणि फक्त नामावर विश्वास आहे त्यामुळे माझ्या इतर इंद्रियांना देखील म्हणजेच काया, मन आणि वाचा यांना देखील हाच नाद लागूदे असा तू मला वर दे.

 

संत तुकोबा म्हणतात आता शेवटचे एकच मागणे आहे आणि ते म्हणजे संतसंगती. कारण मी जर त्यांच्या सानिध्यात राहिलो तर नामाचा रंग माझ्या मनावर आणि अंतःकरणावर पूर्णपणे चढेल.

या मंत्राचा अजून एक अर्थ सांगितला आहे की या मंत्राचा जप केल्याने आपण देवाशी जोडले जातो. या मंत्राचा जप करणे खुप सोपे आहे. जीवनात सुखी आणि समाधानी होण्यासाठी या मंत्राचा जप करावा. तसेच राम म्हणजे समाधान, कृष्ण म्हणजे प्रेम, करूणा होय. राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. भक्तांना भगवान विष्णूची आठवण राहावी यासाठी या मंत्राचा जप केला जातो.

 

टिप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *