ताज्या बातम्या

सरदार वल्लभाई पटेल यांची संपूर्ण माहिती


सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक प्रशंसनीय शिल्पकार होते. ते दिसायला अतिशय शांत आणि निसर्गात: मिळालेल्या आपल्या स्वभावाबद्दल ओळखले जातात. सरदार वल्लभभाई पटेल प्रथम गृहमंत्री आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. तसेच वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे म्हणजेच न्यू इंडियाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

जन्म :

सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्‍म 31 ऑक्टोबर 1875 साली गुजरात मधील नाडियाड या गावी, त्यांच्या मामाच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जवेरभाई आणि माता लाडबाई यांचे ते चौथे पुत्र होते. त्यांचे वडील खेडा जिल्ह्याच्या करमसद गावाचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई आणि विठ्ठल भाई ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती.

बालपण :

सरदार वल्लभभाई पटेल यांचे बालपण त्यांच्या कुटुंबांच्या सोबत केले. आपल्या वडिलांसोबत शेतीची कामे करण्यासाठी मदत करत असत. आपल्या बालपणी विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी एक संघटना उभी करून एका कठोर शिक्षकांविरुद्ध तीन दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला होता. त्यांच्या बालपणीतून वल्लभभाई अठरा वर्षाचे झाले असता, त्यांचे लग्न जवळच्या गावातील बारा-तेरा वर्षाच्या जवेराबई यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा उशिराने म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी उत्तीर्ण झाले.

शिक्षण :

सरदार पटेल हे लेवा पाटीलदार जातीच्या स्वावलंबी भूसंपत्ती कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. पारंपारिक हिंदू धर्माच्या वातावरणात जन्मलेले हे करमसड येथील प्राथमिक शाळा आणि पटेलाड येथे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 22 व्या वर्षी मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढे वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून तसेच इतरांकडून पुस्तके मागून वकिलीची परीक्षेत पास झाले व पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंड येथे गेले.बॅरिस्टरच्या परीक्षेत त्यांचा पहिला क्रमांक आला व त्यांना 50 पौंड पारितोषिक मिळाले. नंतर ते गुजरात मधील अहमदाबादमध्ये आले व तेथे कायद्याचे पालन करण्यास ते सक्षम झाले. त्यांनी गोधरामध्ये जिल्हा न्यायाधीश यांचे स्वतंत्र कार्यालय स्थापन केले आणि दोन वर्षानंतर ते बोरससोडला गेले. वकील असताना पटेल यांनी अचूक पद्धतीने आपले अनुपलब्ध प्रकरण सादर केले आणि पोलिस साक्षीदार आणि ब्रिटिश लोकांना आव्हान दिले.

समाजासाठी केलेले कार्य :

भारतात परत आल्यानंतर ते अहमदाबाद मध्ये स्थायिक झाले आणि अहमदाबाद मधील गुन्हेगारी कायद्यातील अग्रणी बॅरिस्टर झाले. वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. वकिली करत असताना ते महात्मा गांधीजींच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, आनंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेळतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचारांविरुद्ध सत्याग्रह केला.

या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. ‘भारत छोडो’ आंदोलनात ते आघाडीवर होते. वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब, दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले.

सरदारांनी हिंदुस्थानातील 565 अर्धस्वायत्त संस्थांचे भारतात विलिनीकरण करून घेणे हे सर्वात मोठे कार्य होते. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरुन सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केले आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी हक्कांचे समर्थक होते. भारतात एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस हा भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी गोड स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले म्हणून त्यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली.

राजकीय जीवन :

महात्मा गांधी गुजराती सभेचे अध्यक्ष व वल्लभभाई चिटणीस झाले. त्यांनी 1917- 1918 सालच्या खेळा सत्याग्रहात भाग घेतला आणि तो यशस्वी करून दाखविला. आमदाबाद नगरपालिकेत ते याच वर्षी निवडून आले. त्यानंतर 1924 – 28 दरम्यान ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी अनेक सुधारणा करून अहमदाबाद शहर स्वच्छ व सुंदर केले. त्यांनी केलेल्या सुधारणा जलविकास व्यवस्था व पाणीपुरवठा योजना या दोन महत्त्वाच्या होत्या.

रौलट कायद्याचे वेळी त्यांनी राष्ट्रीय साहित्य विकले व सार्वजनिक निदर्शनात भाग घेतला. गांधींच्या सहकाराच्या त्या चळवळीत सहभागी झालेत. त्यांनी सुख चैनीच्या जीवनाचा त्याग केला व तत्काल वकिली सोडली. या सुमारास दहा लाखांचा निधी गोळा करून गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि लवकरच अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष बनले. 1920 सालचे नागपूर झेंडा सत्याग्रहात त्यांच्याकडे नेतृत्व होते.

त्यांनी तो सत्याग्रह यशस्वी केला. याच सालच्या सत्याग्रहात हे ते यशस्वी झाले. 1927 साली ते नगरपालिकेचे अध्यक्ष असताना, गुजरातमध्ये महापुराचे संकट आले. पूरग्रस्तांना मदत करण्याचे काम त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे.

1930 साली मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाषणबंदीचा हुकुम मोडला आणि भाषण केले त्यामुळे त्यांना शिक्षा व तुरुंगवासही भोगावा लागला. यानंतर त्यांना तीन महिने, नऊ महिने असा आणखीन शिक्षा झाल्यात. सरदारांचे नेतृत्व काँग्रेसमधील कार्याचा विचार करून त्यांना कराची काँग्रेसचे अध्यक्ष स्थान देण्यात आले.

महात्मा गांधी, पटेल यांनाही 1932 मध्ये अटक झाली व स्थान बंद करण्यात आले. त्यांना जुलै 1934 मध्ये सोडण्यात आले. पुढे बिहारच्या भूकंपाच्या वेळी काँग्रेसचे अधिमंडळ प्रवेश विषयक धोरण बदलण्यात आली, पार्लमेंटरी बोर्ड स्थापन झाले आणि सरदार त्याच्या उपसमितीचे अध्यक्ष झाले. 15 जूने 1945 रोजी त्यांची सुटका झाली. सुटकेनंतर शिमला परिषद कॅबिनेट मिशन वगैरे त्यांनी भाग घेतला. त्यांच्या मध्यस्थानी मुंबईच्या नाविक बंडाला आळा घातला गेला.

महात्मा गांधीजींचा 30 जानेवारी, 1948 रोजी खून झाला. आपण गृहमंत्री असताना ही घटना घडावी, या घटनेने ते अत्यंत निराश झाले. या नंतर काही दिवसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली व 31ऑक्टोबर, 1948 रोजी मुंबई त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रत्नजडित सोन्याचा अशोकस्तंभ आणि चांदीची मोठी प्रतिमा त्यांना अर्पण करण्यात आले. त्यानंतर नागपूर प्रयाग उस्मानिया यासारख्या अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी त्यांना दिली. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त, आहमदाबाद शहरात तर्फे त्यांना 15 लाख रुपयांची थैली अर्पण केली.

मृत्यू :

अहमदाबाद शहरातील सत्कारानंतर त्यांची तब्येत आणखीच खालावली गेली व त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सरदार वल्लभभाई पटेल यांची स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडवून आणणारी चाणाक्ष बुद्धी कठोर शिस्त व परिस्थितीचे विलक्षण आकलन हे राजकारणी मसुद्याला आवश्यक असणारे गुण त्यांच्यामध्ये होते.

देशाच्या फाळणीचा द्विराष्ट्रवाद त्यांना अमान्य होता. मुसलमानी भारतामध्येच एकरूप व्हावे असे त्यांना वाटत होते. पण तत्कालीन परिस्थितीच्या दबावाखाली व गांधींमुळे त्यांनी ती योजना नेहरू बरोबर मान्य केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *